मालदीव देश माहिती: Maldives Country Information in Marathi

मालदीव देश माहिती: Maldives Country Information in Marathi (maldives currency, maldives airport name, maldives tourism, maldives to india distance, maldives country capital, maldives president)

सामान्य:

अधिकृत नाव: मालदीव प्रजासत्ताक
स्थान: हिंद महासागर, श्रीलंका आणि भारताच्या नैऋत्येस
लोकसंख्या: अंदाजे 392,000
भाषा: धिवेही (अधिकृत), इंग्रजी
धर्म: इस्लाम (प्रधान)
चलन: मालदीवियन रुफिया (MVR)

Currency:

Currency: 1 MVR = 0.065 USD (अंदाजे), सर्वत्र स्वीकारले जाणारे चलन यूएस डॉलर आहे

Airport:

विमानतळ: वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळ (MLE) माले, राजधानी शहर

Tourism:

लक्झरी रिसॉर्ट्स, प्राचीन समुद्रकिनारे, कोरल रीफ आणि जल क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध

पीक हंगाम: डिसेंबर ते एप्रिल (कोरडा हंगाम)
बहुतेक राष्ट्रीयत्वांसाठी पर्यटक व्हिसा ऑन अरायव्हल (३० दिवसांपर्यंत)
भारताचे अंतर: मुख्य भूमीपासून अंदाजे 750 किमी, भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ
राजधानी शहर: Male
अध्यक्ष: मोहम्मद मुइज्जू, सप्टेंबर 2023 मध्ये निवडून आले

मालदीव हा हिंदी महासागरातील एक आश्चर्यकारक द्वीपसमूह आहे, जो त्याच्या नीलमणी पाणी, मूळ समुद्रकिनारे आणि आलिशान ओव्हरवॉटर बंगल्यांसाठी ओळखला जातो. पण या नंदनवनाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?

मालदीवमध्ये दोन मुख्य हंगाम आहेत:

कोरडा ऋतू (डिसेंबर ते एप्रिल): उत्तम हवामानासह हा सर्वाधिक पर्यटन हंगाम आहे. सूर्यप्रकाश, शांत समुद्र आणि किमान पावसाची अपेक्षा करा. रिसॉर्ट्स आणि फ्लाइट्स त्यांच्या उच्च किमतीत असतात म्हणून भेट देण्याची ही सर्वात महाग वेळ आहे.

ओले हंगाम (मे ते नोव्हेंबर): या हंगामातील हवामान अधिक अप्रत्याशित आहे, पावसाच्या सरी आणि अधूनमधून वादळे. तथापि, भेट देण्याची ही सर्वात स्वस्त वेळ आहे आणि तुम्हाला कमी गर्दी आढळेल. तुम्‍ही बजेटवर असल्‍यास आणि अधूनमधून पडणार्‍या पावसाची तुम्‍ही हरकत नसल्‍यास, मालदीवला भेट देण्‍यासाठी ओला हंगाम हा एक चांगला काळ असू शकतो.

मालदीवला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ निवडताना विचारात घेण्यासाठी येथे काही अतिरिक्त घटक आहेत:

किंमती: कोरड्या हंगामात भेट देण्यासाठी सर्वात महाग वेळ आहे, म्हणून जर तुम्ही बजेटमध्ये असाल तर हे लक्षात ठेवा.
गर्दी: मालदीवमध्ये पीक सीझनमध्ये गर्दी होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला अधिक शांततापूर्ण अनुभव आवडत असेल तर, खांद्याच्या हंगामात (मे-जून किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर) भेट देण्याचा विचार करा.
सण आणि कार्यक्रम: मालदीवमध्ये वर्षभर अनेक सण आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे तुम्हाला यापैकी एकाच्या आसपास तुमच्या सहलीची योजना करायची असेल.

Maldives Tourism Loss Reasons:

सध्या मालदीव आणि भारत या दोन देशांचे रिलेशन खूपच खराब होताना दिसत आहे, आणि अशातच या संधीचा फायदा घेऊन चीन हा देश पुढे आलेला आहे. चीन हा भारताचा सर्वात जवळचा देश आहे आणि भारताला या देशापासून नेहमीच धोका आहे. याचाच फायदा घेऊन चीनने मालदीवला मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

भारतीय नागरिकांनी मालदीव या देशावर बहिष्कार घातल्यानंतर चीन या देशाने पाठिंबा दर्शवला आहे. आणि अशातच भारताचे समर्थन करण्यासाठी भारताचा शेजारील देश बांगलादेश हा भारताच्या समर्थांना आलेला आहे. बांगलादेशाचे फॉरेनर मिनिस्टर डॉ. ए के अब्दुल मोमीन यांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे.

भारताने मालदीव या देशाचा बहिष्कार केल्यानंतर मालदीवचे प्रेसिडेंट Muizzu यांनी चीन या देशाचा भेटीस गेले आहे. त्यांनी चीन या देशाला जास्तीत जास्त पर्यटक आमच्या देशामध्ये पाठवावे अशी विनंती केलेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लक्षदीप भेटीनंतर मालदीव या देशाने भारताची निंदा केली होती आणि त्याचेच पडसाद आता मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे. कारण की मालदीव या देशाची आर्थिक व्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे आणि जास्तीत जास्त पर्यटन हे भारतातून मालदीवला जात असतात त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था आता संकटात असल्याचे दिसत आहे आणि हेच संकट पाहून मालदीवचे चीन या देशाच्या भेटीला गेलेले आहे.

मालदीव या देशाचा बहिष्कार केल्यानंतर आता भारताचे नागरिक लक्षद्विप या बेटाला भेट देण्यात जास्त उत्सुक असलेले दिसत आहे. त्यामुळे मालदीव या देशाची अर्थव्यवस्था आता संकटात आलेली आहे. दरवर्षी भारतातून मालदीव या देशाला 209.2 k पर्यटन भेट देत होते. त्यामुळे मालदीव या देशाची आर्थिक व्यवस्था सुधारली होती.

मालदीव या देशाचा बहिष्कार केल्यानंतर अनेक देश भारताच्या समर्थनास उभे राहिलेले आहे. इजरायल सारखा देश भारताच्या मदतीसाठी नेहमी पुढे आहे. तसेच टाटा ग्रुपनेदेखील लक्षदीप बेटांवर आलिशान हॉटेल उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लक्षद्वीप या बेटांवर पर्यटकांची गर्दी वाढताना दिसणार आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम मालदीव या देशावर होणार आहे.

मालदीव आणि भारत बहिष्काराची सुरुवात झाली माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षदीप दोऱ्यानंतर. 4 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षदीप या बेटांच्या दौऱ्यावर गेले होते आणि तेथे त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि त्यानंतर लोकांचा लक्षदीप बेटावर जाण्याची इच्छा झाली. सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालेले फोटो पाहून मालदीव या देशाच्या लोकांनी नाराजगी व्यक्त केली त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या टेन्शनचे वातावरण आहे. येणाऱ्या काळामध्ये मालदीव या देशाला जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon