बारावी इयत्तेचा शेवटचा दिवस १०० ओळी मराठी निबंध

प्रस्तावना
बारावी इयत्तेचा शेवटचा दिवस १०० ओळी मराठी निबंध: बारावी इयतेमध्ये शिकत असताना शेवटचा दिवस आला. जेव्हा आम्ही कॉलेजचा निरोप घेणार कॉलेजचा निरोप घेतल्यानंतर आयुष्याची सुरुवात कशी करावी याबद्दल घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय.

बारावी इयत्तेचा शेवटचा दिवस १०० ओळी मराठी निबंध

बारावी कॉमर्सच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मी व्यवस्थित अभ्यास केला होता. बारावी झाल्यानंतर माझे भविष्य काय? याची चर्चा आई-बाबा-दादा यांच्यात मात्र अधूनमधून होत होती. आईला वाटत होते की मी जाऊन एडवोकेट व्हावे तिचे आजोबा वकील होते त्यांचा रुबाब तिला आठवत होतं एडवोकेट हो असा ती माझ्या मागे शोधा लावत असे, बाबा बँकेचे शाखेचे व्यवस्थापक होते त्यांच्या नोकरीची वर्ष आता संपत आली होती. मी नोकरी करत करत शिकावे जे जमेल ते करावे असा त्यांचा दृष्टिकोन होता तरीसुद्धा उच्च शिक्षण घेण्यास त्यांनी विरोध नव्हता. दादाने बँकेकडून कर्ज घेऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे छानसे दुकान काढले होते दुकानाचा व्याप वाढत होता दादाला मदतनीस हवा होता म्हणून मी त्याला धंद्यात मदत करावी असे त्याला वाटत होते.

सगळ्यांची मते ऐकताना माझं मात्र प्रचंड गोंधळ उडत होता. समोर अनेक मार्ग असावेत पण कोणत्या मार्गाला गेले असता आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोचू ते कळत नव्हते. कोणालाच दुखावसे वाटत नव्हते व कसल्यातरी दडपणामुळे आपले विचारही मोकळेपणाने बोलून दाखवू असे वाटत नव्हते. मला एम कॉम करून कॉलेजात प्राध्यापक व्हायचे होते पुस्तके घेऊन या वर्गातून त्या वर्गात जाणाऱ्या किंवा लायब्ररीत पुस्तकाचे वाचनात घडून गेलेल्या प्राध्यापकांमध्ये मी नेहमीच माझे प्रतिबिंब पाहत असे.

आज परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर घरात ही चर्चा सुरू होईल असे वाटले, पण मी घरातून बाहेर पडलो कॉलेजकडे वळलो आमचा अभ्यासक्रम केव्हाच शिकून संपला होता. पण आज आमचे अर्थशास्त्रचे सर्व वर्गात एक चर्चासत्र घेणार होते. मी अर्थमंत्री होऊन कॉलेजचा अर्थसंकल्प तयार करणार होतो व त्याचे वाचन वर्गात करणार होतो. वर्गातील काही विद्यार्थी विरोधी पक्षाचे नेते होऊन चर्चा करणार होते. तास सुरू झाला मी धडधडत्या अंतकरणाने प्लॅटफॉर्मवरील टेबलाजवळ उभा राहून वाचू लागलो. सर मागील बाकावर बसले होते. सर आणि माझे वर्गमित्र माझे वाचन बारकाईने ऐकत होते. सरांच्या चेहऱ्यावर अनुकूल बदल पाहून मला वाचायला हुरूप वाटत होता. मुलांनी घेतलेल्या आक्षेपांना मी व्यवस्थित उत्तरे देत होतो. मी जिथे अडकत होतो तेथे सर मदत करत होते.

तास संपला, सर पुढे आले. पाठीवर शाबासकी देऊन त्यांनी माझे कौतुक केले. “मुलांचे पाय पाळण्यात दिसतात यातून आपल्या भारताला भविष्यकाळात एक चांगला अर्थशास्त्रज्ञ मिळेल असे आपण समजू या” अशी माझी जरा जास्तच स्तुती त्यांनी केली. त्यांनी सर्वांना उद्देशून परीक्षेत सुयश चिंतले. ते म्हणाले लक्षात ठेवा नेपोलियनच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नव्हता, तेव्हा हाती घ्याल ते तडीस न्या यश खेचून आणा तुमचे स्वतःचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.

सरांच्या आशीर्वादाने जणू काही माझ्या मनातल्या गोंधळालाचे उत्तर दिले होते, ते नेमके कोणत्या वाटेने जायचे ते मला चांगले समजले होते. तेथेच माझे स्वप्न माझी वाट पाहत होते.

बारावी इयत्तेचा शेवटचा दिवस १०० ओळी मराठी निबंध

1 thought on “बारावी इयत्तेचा शेवटचा दिवस १०० ओळी मराठी निबंध”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा